![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPwOJku5qWayk3RXuQzDGDt9FZxTzh9Aal1X6Frhaap1vwXgrlhv7ThPDJ8T8_oOCr-bT65B-hpGXJM_urSmv3CXYIGgHd64o2Q9z7VXypT5gn2wmWh9JOXHZ2PYVz0jFp-r6ZOWGDAT3t93R0A2L1ln4MGdPmZmOW0kbpyKXuSy0x0C9JDt5LqzFd/w640-h360/-1_orig.jpeg)
"समाजात दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे." - प्रदीप पराडकर यांचे रोह्यात प्रतिपादन जनकल्याण समितीच्या सेवारथ यात्रेचे रोह्यात समारोप रोहा- प्रतिनिधी "समर्पित भावनेने लोकोपयोगी आणि सेवाभावी कार्य केले गेले पाहिजे, समाजातील दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे", असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांनी रोहा येथे केले.जनकल्याण समितीतर्फे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सेवारथ यात्रेचे समारोप रोह्यात झाले, त्यावेळी ते बोलत होते. गेली सात दिवस पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आणि पाच हजार लोकांपर्यंत भेटी देऊन रोह्यात परतलेल्या सेवारथ यात्रेचे समारोप मंगळवारी सायंकाळी मातोश्री मंगल कार्यालयात झाले. यावेळी व्यासपीठावर जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर, मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोंकणचे कार्यवाह अविनाश धाट, रायगड जिल्हा संघ चालक किसन घाग, समितीचे जिल्हाध्यक्ष जयेश छेडा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप पराडकर बोलत होते.