![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiGezBK83zx6l48K-Tef5rv9piK_CfZtVDuqvK_q_JRAszgpM0i2YgzuJ1tHwdnqWX-2oKXGhHjkiqb4LNGa8OD5-95saPTSf9wBd696Ja1Wviaoi4CRJe6zHcuaVuRdbkye5m845kS-_4u4HRkj4MICt-mBHCMVeMDVmyjcq2_vWmTDJdRYZ2vx4oE/w640-h360/-1_orig.jpg)
रोह्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात,तिकिट वाढ कमी व्हावी यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा यांनी घेतली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट वरिष्ठ डी.आर. एम. अधिकारी मध्य रेल्वे यांनी मागण्या पुर्ण करण्याचे दिले आश्वासन मुंबई -प्रतिनिधी श्री.अभिजित धुरतसाहेब,अध्यक्ष महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ यांच्या प्रेरणेने, गुरुवार दिनांक २८/०७/२०२२ ला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पूर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा,यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाऊन घेतली वरिष्ठ डी. आर. एम.अधिकारी यांच्या सोबत भेट घेतली.या भेटीत महासंघाने मागण्यांचे निवेदन सादर केले.ते पुढील प्रमाणे- १) सेंट्रल रेल्वे चे अंतिम स्टेशन रोहावरून सकाळी ६:३० ते ७:०० दरम्यान रोहा - दिवा अथवा पनवेल मेमु ट्रेन सेवा सुरू करा. २) पूर्वी थांबत असलेले मेल एक्सप्रेस थांबे रद्द केले ते पुन्हा मिळावे. उदा.दिवा - सावंतवाडी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस जे मेल ,एक्सप्रेस ट्रेन रोहा मध्ये तांत्रिक थांबे घेत अशा ट्रेन ना कायम स्वरुपी थांबे व तिकीट मिळावे. ३)