तळा परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न
तळा -संजय रिकामे
मागील सरकारच्या काळात विकास खुंटला होता. राज्य शासनाकडून शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मदत मिळाली नव्हती. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी तळा शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्यास सुरुवात केली असताना ग्रामीण भागात देखील विकासकामे जोमाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कासेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे आणि कासेवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे उद्धघाटन त्याचप्रमाणे शेणाटे येथील अंगणवाडीचे उद्धघाटन पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTpbRD433vBI38tVFszW61Pz5AlPs86hCrGrKoLEgV4psdKTA_1MI7on57XmEHf1jaha7cuIHTPxET6r3979QQiRk2WB1znw4pSJRIIuAWxSVuKu2FLZoaauYgM5ogGaeTlN3XT6aiTowhET8I9fFJzlDT93ZrIqV3mqdfWUXTnfekUVCjWNHLiRIh/w640-h360/IMG-20220523-WA0011.jpg)
या उद्धघाटन समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव, रा.जि.प.सदस्य बबन चाचले, समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत राऊत,शेणवली ग्रामपंचायत सरपंच निकिता गायकवाड,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,कैलास पायगुडे,जगदीश शिंदे,संदेश वाजे ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment