आमदार कै.पा.रा.सानप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा झुंजार नेता,

तरुणांनो समाज संघटित करा :- शंकरराव म्हसकर     


कोलाड -श्याम लोखंडे 

४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसे, त्या काळात आमदार पा.रा.सानप यांनी सहकार क्षेत्राची निर्मिती केली व शेतीचे मालक कुळ झाले पाहिजे यासाठी दादासाहेब यांनी सर्वांना एकत्रित करून मोठा लढा दिला व संघर्ष केला.त्याकाळात तालुक्यातील गोवे येथील ५७ एकर जमीन काबीज करण्याचा सरकार प्रयत्न करित होते परंतु खंदे समर्थक रावजी जाधव (कारभारी)विठ्ठल पवार व इतर १६ नेते हाताशी घेऊन संघर्ष करून आमदार पा.रा.सानप यांनी तो प्रयत्न हाणुन पाडला होता. खऱ्या अर्थाने पा.रा.सानप हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे झुंझार नेते होते.त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी त्यांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यासाठी तरुणांनो तंटे मिटविण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाज संघटित करा. त्यांचा आदर्श निर्माण केला पाहिजे समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत कै. पा. रा. सानप यांच्या स्मृतिदिनी कोलाड ग्रुप कुणबी समाजाच्या सभेत कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी व्यक्त केले.        


         
कुणबी समाजनेते तथा माजी आमदार स्व. पा.रा.सानप यांचे 27 वे पुण्यस्मरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघ मुबंई व रायगड जिल्हा समन्वय समिती ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड च्या वतीने कोलाड येथील मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते .यावेळी विचारमंचावर खांब विभागीय नेते रामचंद्र चितळकर, नारायणराव धनवी,मारुती खांडेकर,ऍड. सुनिल सानप, राजेश सानप, रोहा पंचायत समितीच्या सदस्या व माजी सभापती सौ.विणाताई चितळकर, विजय सानप,दिवाणशेठ सानप,प्रमुख मान्यवर व कोलाड विभागातील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की सलग तीन वेळा दादासाहेब विधिमंडळात जनमतांवर निवडून गेले, त्यावेळी ग्रामीण जनतेची व शेतकऱ्यांची उपजीविका म्हणजे शेती. त्यामुळे त्याला हमी भाव मिळाला पाहिजे ,तसेच बेदखल कुळांचा प्रश्न यासाठी आवाज उठवत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न दादासाहेबांनी विधानभवनातुन केला. 

या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन,श्री गणेशाला व शिवछत्रपती शिवरायांना वंदन तसेच माजी आमदार कै.पा.रा.सानप यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.

तद्ननंतर मान्यवरांचे स्वागत तसेच पत्रकार श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे,विश्वास निकम,रविना मालुसरे,यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या समाज बांधवांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.

  माजी आमदार स्व.पा. रा. सानप यांच्या 27 व्या पुण्यस्मरण सोहळ्यास कोलाड विभागातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या प्रसंगी कुणबी समाज नेते रामचंद्र चितळकर,नारायण धनवी,ह.भ.प.दहिंबेकर महाराज, दगडू शिगवण, विजय सानप,एकनाथ बागुल, ऍड. सुनिल सानप,चंद्रकांत लोखंडे,डॉ.मंगेश सानप,डॉ.सागर सानप,राजेश सानप,शिवराम महाबळे,अजय कापसे सर,विलास सुटे सर इ.मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांनी दादांचे स्मरण व आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले आमदार पा.रा.सानप यांनी समाजासाठी संघर्ष केला.

न्याय्यहक्कासाठी लढा उभा केला. सहा महिने हद्दपार देखील झाले,तरी देखील समाज जागृत केला.

समाज सुशिक्षित झाला पाहिजे, ही भावना उराशी बाळगत समाज्यासाठी निष्ठेने काम केले. नारायण धनवी यांनी त्यांच्या आठवणीतील एक किस्सा सांगितला, "नारायणराव तुमच्या खिश्यात एक रुपया असेल तर त्यातील बारा आणे हे समाज्याचे आहेत तर केवळ चार आणेवरच तुमचा अधिकार"; असा आर्थिक उलढालीचा अभ्यास स्व. दादांना असल्याचा एक अनुभव व्यक्त केला. तर त्यांच्या वागण्याचा व त्यांच्या जीवनातील प्रवास तीन वेळा आमदार झाले परंतु तिन्ही वेळेला वेगवेगळ्या मतदारसंघातुन ते निवडून आले. सुरवातीला रोहा -सुधागड,रोहा- मुरुड व नंतर रोहा -माणगाव असा खडतर आणि विरोधकांना भडिमार असा निवडणूकीचा प्रवास त्या काळात विरोधी बाकावर बसत ,आपली शैक्षणिक पात्रता पणाला लावत ,सरकारला धारेवर धरत, ग्रामीण जनतेच्या न्याय हक्कासाठी सळो की पळो करून सोडत असत. त्यांच्या बद्दलच्या प्रसंग ऐकताना अनेकांचे अश्रू अनावर झाले.

समाज पुढे नेण्यासाठी आपल्या समाजाचे जातीचे दाखले,रूढी परंपरानुसार चाललेले अतिरिक्त खर्च टाळणे,शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणे यासाठी तरुण व जेष्ठ एकत्र येऊन मार्ग कसा काढता येईल असे प्रयत्न केले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने कुणबी समाजाचे नेते माजी आमदार पा. रा.सानप यांचा स्मृतीस अभिवादन ठरेल.तर नंदकुमार मरवडे सर यांनी आपल्या काव्यातुन संभे गावाचे सुपत्र आमदार पा.रा.सानप यांना आदरांजली वाहिली, त्यांच्या  गायनाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कै.आमदार पा. रा. सानप यांचे २७ वे पुण्यस्मरण सोहळा कोलाड ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश निवाते यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश सानप,राजेश कदम,डॉ. मंगेश व डॉ सागर सानप,यांच्यासह कोलाड ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog