अवकाळी पावसाचा रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्याला पुन्हा तडाखा 

फळबाग, कडधान्य पिक धोक्यात, गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर , शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ


कोलाड- श्याम लोखंडे

 सध्या बळीराजाच्या नशिबी सुगीचे दिवस नाहीच! या ना त्या कारणाने बळीराजा कायम ग्रासला आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे संकटे येतच आहेत.तरी देखील सर्वांचीच भूक भागवण्याचे काम कबाड-कष्ट करून तो भागवत असतो.मागील  आठ पंधरा दिवसांपूर्वी हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस कोसलला,त्यात आता पुन्हा 1डिसेंबर पासून तीन ते चार दिवस हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या प्रमाणे रोहा सकाळी साडे सहा वाजल्या पासून पाऊस सुरू झाला.अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातच त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी- बागायतदारांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे ,त्यामुळे तालुक्यात खरिपाच्या पिकानंतर शेतकरी कडधान्य व भाजीपाला पीक घेतात परंतु शेतात पाणी साचून राहिल्याने या पिकांवर पसरलेली अमरवेल व  कीटक नाशकाचा पादुर्भावाचा आता मोठा धोका निर्माण झाला आहे कडधान्य पिकच वाया  जात असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांना चिंतेचे ग्रहण लागले असून याचा मोठा फटका सर्व सामान्य ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला बसला आहे. तर गुरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे.



भारतीय हवामान खात्याने  दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 1 डिसेंबर पासून पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार असे अंदाज व्यक्त केला होता त्या धर्तीवर पुन्हा अवकाळी वरुण राजा धडकला. हंगामातील भात शेतीचे साठून ठेवलेल्या  मळण्या अद्याप त्यांची झोडणी मळणी न झाल्याने त्या उघड्यावर असल्याने भर पावसात भिजत असून पाणी साचल्याने त्या धानाची नासाडी होत आहे. तर वेळोवेळी कोसळत असलेल्या या अवकाळी पावसामुळे संपूर्ण कडधान्य पीक वाया गेल्याने बळीराजाची चिंता वाढली असून तो हतबल झाला आहे .



आता अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील  दुर्गम व ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेले भात पिक भिजल्याने नुकसान झाले आहे.शेतात कडधान्य पेरलेल्या वाल,पावटा, चवळी, मटकी, मूग,तूर,चणा आदी.पिके, भाजी-पाला व आंबा पिकांवर याचा मोठा परिणाम होण्याची चिंता आता सर्वत्र व्यक्त होत असून या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत अधिक वाढ झाली असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी समाज सेवक व  राष्ट्रीय छावा संघटना दक्षिण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष निलेशभाई महाडिक यांनी केली आहे .

Comments

Popular posts from this blog